About us
हल्लीच्या काळात लग्न जमवणे ही फारच कठीण गोष्ट बनली आहे याचे मुख्य कारण म्हणजे लोकांच्यात प्रचलीत असलेल्या चुकीच्या कल्पना आत्ताच्या वैज्ञानिक युगात लोकांमध्ये (पालकांमध्ये) अनेक वेड्या कल्पना रुढ आहेत. उदा: मंगळ, कुंडली जमणे, राशी, कुळी इ. यामुळे पालक हाताशी आलेले चांगले स्थळ सोडून देतात.
तसेच सध्याच्या युगात मुले व मुली फारच शिकल्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या आपल्या जोडीदारा बददलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यासाठीच पालकांना व मुलामुलींना योग्य मार्गदर्शन करण्याच्या हेतूने मी प्रत्येक महिन्यातून वेगवेगळ्या शहरात वधू -वर परिचय मेळाव्यांच्या माध्यमातून माझे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत असते.